
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील एकूण ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत निर्णायक पाऊल उचलले आहे. या कारवाईत अनेक दहशतवादी ठिकाणांचा विनाश झाला असून, भारताने पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा जोरदार प्रतिशोध घेतला आहे.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्करी तज्ज्ञ कमर चीमा यांनी सोशल मीडियावर काही ट्विट करत भारताच्या कारवाईचे पुरावे सादर केले आहेत. त्यांनी हवाई हल्ल्यांनंतरच्या क्षणांचे व्हिडीओ शेअर करत दावा केला आहे की, "पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून, भारताला प्रत्युत्तर देण्याशिवाय आता पाकिस्तानाकडे पर्यायच उरलेला नाही."