
नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याची शंका व्यक्त करताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगाला धारेवर धरले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाच्या यशस्वीतेवर शंका उपस्थित करताना त्यांनी बेरोजगारीसारख्या समस्येवर संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार अथवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार या दोघांनाही तोडगा काढता आलेला नाही असे त्यांनी नमूद केले.