

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा उद्यापासून उत्तरार्ध सुरू होत असून भारत-अमेरिका आयात शुल्कावरून ट्रम्प प्रशासनाने चालवलेली मनमानी, मतदारयाद्यांमधील कथित हेराफेरी, मणिपूरमध्ये नव्याने उफाळलेला हिंसाचार, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ पुनर्रचना आणि वक्फ दुरुस्ती विधेयकावरून सत्ताधारी मोदी सरकार आणि विरोधी इंडिया आघाडी यांच्यात जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.