काश्मीर हा भारताचाच भाग; पाकिस्तानची कबुली

Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi
Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi

जिनीव्हा : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाकडून निराशा झालेल्या पाकिस्ताननने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर (UNHRC) भारताविरोधात ११५ पानांचं डॉजिअर सादर करत भारतावर काही आरोप केले आहेत. पंरतु, काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासमोर आपली बाजू मांडली.  त्यावेळी, काश्मीर हा भारताचाच भाग असल्याची कबुली दिली. परंतु, भारताने मानवाधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ही कबुली दिली आहे. मेहमूद कुरेश यांनी जिनिव्हामध्ये बोलताना जम्मू आणि काश्मीर हे भारताचेच राज्य असल्याची कबुली दिली आहे. 

काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाला असल्याचा दावा भारत करत आहे, पण, मग भारत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं, संस्थांना जाण्याची परवानगी का देत नाही ? त्यांना माहिती आहे असं केलं तर सत्य जगासमोर येईल, असंही कुरैशी यांनी यावेळी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com