
सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी मारले गेले होते.
नवी दिल्ली : संसदेवर हल्ला होऊन आज 19 वर्षे झाली. 13 डिसेंबर, 2001 रोजी दहशतवाद्यांनी देशाच्या संसदेवर हल्ला केला होता. पाच बंदुकधारी लोकांनी संसदेच्या परिसरावर हल्ला करत तिथे अंधाधुंद असा गोळीबार केला होता. आज त्या काळ्या घटनेला 19 वर्षे पूर्ण झाली. त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री यांनी संसदेच्या संरक्षणार्थ प्राण गमावलेल्या लोकांच्या आठवणीत श्रद्धांजली वाहिली आहे.
We will never forget the cowardly attack on our Parliament on this day in 2001. We recall the valour and sacrifice of those who lost their lives protecting our Parliament. India will always be thankful to them.
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2020
पंतप्रधानांनी ट्विट करुन म्हटलं की, आपण आजचा संसदेवर झालेला भ्याड हल्ला कधीही विसरणार नाही. आपल्या संसदेची सुरक्षा करताना ज्या प्राण गमावलेल्या लोकांचं शौर्य आणि बलिदानाची आठवण आपण काढूया. भारत नेहमीच त्यांच्या ऋणात राहिल.
2001 में लोकतंत्र के मंदिर संसद भवन पर हुए कायरतापूर्ण आतंकी हमले में दुश्मनों से लोहा लेते हुए अपना सर्वोच्च न्योछावर करने वाले माँ भारती के वीर सपूतों को कोटि-कोटि नमन करता हूँ। कृतज्ञ राष्ट्र आपके अमर बलिदान का सदैव ऋणी रहेगा। pic.twitter.com/lbhn6FlTH9
— Amit Shah (@AmitShah) December 13, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या वीरांच्या आठवणी जाग्या करत म्हटलं की, 2001 मध्ये लोकशाहीचे मंदिर संसद भवनावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शत्रूंशी दोन हात करणाऱ्या भारतमातेच्य वीर पुत्रांना मी कोटी कोटी नमन करतो. कृतज्ञ राष्ट्र आपल्या अमर बलिदानासाठी सदैव ऋणी राहिल.
या हल्ल्यादरम्यान दिल्ली पोलिसांचे पाच जवान, केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या एक महिला कर्मचारी, संसद परिसरात तैनात असलेले एक वॉच एँड वार्ड कर्मचारी आणि एक माळी शहिद झाला होता. तर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी मारले गेले होते.