
नवी दिल्ली : ‘‘शांततेचा काळ हा केवळ एक ‘भ्रम’ असून, तुलनेने शांततेच्या काळातसुद्धा भारताने अनिश्चिततेसाठी सज्ज राहिले पाहिजे,’’ असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान दाखवलेल्या शौर्यासाठी सशस्त्र दलांचे संरक्षण लेखा विभागाच्या परिषदेत कौतुक करताना ते बोलत होते.