Rajnath Singh: शांतताकाळातही हवी सज्जता; संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन, शांततेचा काळ ‘भ्रम’ असल्याचे मत

Indian Defence: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'शांततेचा काळ हा भ्रम आहे' असे सांगत संरक्षण सज्जतेचा पुन्हा उच्चार केला. स्वदेशी संरक्षण उत्पादन, अंतर्गत मूल्यांकन व जागतिक स्थितीचा त्यांनी उल्लेख केला.
Rajnath Singh
Rajnath Singhsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘शांततेचा काळ हा केवळ एक ‘भ्रम’ असून, तुलनेने शांततेच्या काळातसुद्धा भारताने अनिश्चिततेसाठी सज्ज राहिले पाहिजे,’’ असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान दाखवलेल्या शौर्यासाठी सशस्त्र दलांचे संरक्षण लेखा विभागाच्या परिषदेत कौतुक करताना ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com