2G च्या निराशेतून निघून भारताची 5G आणि 6G कडे वाटचाल : PM मोदी

PM Modi on 5G Technology
PM Modi on 5G Technologye sakal

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या रौप्य महोत्सवी समारंभाला संबोधित केले. मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे IIT मद्रासच्या नेतृत्वाखालील एकूण आठ संस्थांद्वारे बहु-संस्था सहयोगी प्रकल्प म्हणून विकसित केलेला 5G टेस्टबेड (5G Testbed) देखील लॉन्च केला.

PM Modi on 5G Technology
बुद्ध जयंतीनिमित्त PM मोदी नेपाळ दौऱ्यावर, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

मोदींनी ट्रायच्या रौप्यमहोत्सवी शुभेच्छा दिल्या. आज तुमच्या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली हा आनंददायी योगायोग आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात पुढील 25 वर्षांच्या रोडमॅपवर देश काम करत आहे. मला स्वदेशी 5G टेस्टबेड देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली. दूरसंचार क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असं मोदी म्हणाले.

रोजगाराच्या संधी वाढतील- मोदी

देशाचे स्वतःचे 5G मानक बनवले ही देशासाठी खूप अभिमानाची बाब आहे. देशातील खेड्यापाड्यात 5G तंत्रज्ञान पोहोचवण्यात हे मोठी भूमिका बजावेल. 5G तंत्रज्ञान देशवासियांच्या जीवनातील सुलभता, व्यवसाय करण्याची सुलभता यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक यांसारख्या प्रत्येक क्षेत्रातील वाढीला चालना मिळेल. त्यामुळे सुविधाही वाढणार असून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होणार आहेत, असंही मोदी म्हणाले.

5G भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देईल -

5G तंत्रज्ञान येत्या दीड दशकात भारताच्या अर्थव्यवस्थेत ४५० अब्ज डॉलरचे योगदान देईल, असा अंदाज आहे. फक्त इंटरनेट नव्हेतर विकास आणि रोजगाराचा वेग देखील वाढणार आहे. असेच 5G तंत्रज्ञान आणखी विकसित करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या दशकाच्या अखेरीस आपल्याला 6G सेवा सुरू करता येईल का? त्यादृष्टीने आपली टास्क फोर्स काम करत आहे. आमचे स्टार्टअप्स जलद तयार करण्याचा आणि दूरसंचार क्षेत्रात आणि 5G तंत्रज्ञानामध्ये जागतिक चॅम्पियन बनण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही मोदींनी सांगितलं.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, आमचे दूरसंचार क्षेत्र हे आत्मनिर्भरता आणि अर्थव्यवस्थेवर कसा प्रभाव पाडते याचे उत्तम उदाहरण आहे. 2G युगातील निराशा, भ्रष्टाचार, धोरण यातून बाहेर पडून देशाने 3G ते 4G आणि आता 5G आणि 6G कडे वेगाने वाटचाल केली आहे. आज आपण देशातील टेलि-डेन्सिटी आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत जगातील सर्वात वेगवान विस्तार करत आहोत. त्यामुळे टेलिकॉमसह अनेक क्षेत्रांनी त्यात भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षांत सरकार ज्या पद्धतीने नवीन विचार आणि दृष्टीकोन घेऊन काम करत आहे, ते तुम्हाला माहिती आहे. भारतातील मोबाईल उत्पादन युनिट 2 वरून 200 पर्यंत वाढले आहेत. भारत आज जगातील सर्वात मोठे मोबाईल उत्पादन केंद्र आहे, अशी माहितीही मोदींनी दिली.

लाखो खेड्यांमध्ये इंटरनेट पोहोचले - मोदी

2014 पूर्वी भारतातील 100 ग्रामपंचायती देखील ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटीने जोडलेल्या नव्हत्या. आज आम्ही सुमारे अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणली आहे. सरकारने नक्षलग्रस्त देशातील अनेक आदिवासी जिल्ह्य़ांमध्ये 4G सुविधा देण्यासाठी मोठी सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com