PM Narendra Modi : राजद कधीही माफी मागणार नाही; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानावरून मोदी यांचा हल्लाबोल

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सभेत काँग्रेस व राजद पक्षांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाबाबत जोरदार टीका केली.
PM Narendra Modi
PM Narendra Modisakal
Updated on

सिवान (बिहार) : ‘राष्ट्रीय जनता दलाने (राजद) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला असून वारंवार मागणी करूनही ते माफी देखील मागत नाहीत. राजद आणि काँग्रेस पक्ष स्वत:ला डॉ. आंबेडकर यांच्यापेक्षा मोठे असल्याचे दाखवत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी अवमान केला. मात्र डॉ. आंबेडकर हे मोदींच्या हृदयात आहेत. बिहारची जनता आंबेडकरांचा अपमान कधीही विसरू शकत नाही,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजदच्या नेत्यांवर केली. सिवान येथे आयोजित सभेत त्यांनी कॉंग्रेस आणि राजदवर भाषणातून हल्लाबोल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com