आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीला ‘आपनिर्भर’ बनवले; अमित शहा

दिल्लीत भलेही ‘आप’ सरकार असले तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत
pm narendra modi Atmanirbhar Bharat Amit shah criticize aap govt arvind kejriwal
pm narendra modi Atmanirbhar Bharat Amit shah criticize aap govt arvind kejriwal Sakal

नवी दिल्ली : देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध आहे, तर आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीला ‘आपनिर्भर’ बनवले आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. दिल्लीत भलेही ‘आप’ सरकार असले तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यामुळे दिल्लीकरांची विकासाची कामे रोखली जाणार नाहीत, असेही त्यांनी आश्‍वस्त केले.
केंद्र सरकारतर्फे दिल्लीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उद्‌घाटन अमित शहा यांच्या हस्ते आज झाले. तेहखंड भागात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात रोज २५ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने शहा यांनी आगामी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा शंखनाद केला. या निवडणुकीत भाजप आणि आप यांच्यात थेट लढत असून भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने ही महापालिका निवडणूकही प्रतिष्ठेची केली आहे. केजरीवाल सरकार मोठमोठ्या आणि कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देऊन दिल्लीकरांची दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप आहे. तोच धागा पकडून शहा यांनी, केजरीवाल सरकार जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना फसवत असल्याची टीका केली. तसेच, ७० वर्षांत केंद्रामध्ये सत्तेवर आलेल्यांनी गांधीजींच्या स्वच्छतेच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले होते. नरेंद्र मोदी यांनी मात्र महात्मा गांधींजींचा संदेश प्रत्यक्षात आणून स्वच्छ भारत मोहिमेला प्रारंभ केला, असेही शहा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com