man ki baat up gaj mitra
sakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' च्या १३३ व्या भागात देशातील निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी स्थानिक लोकांनी केलेल्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशातील 'गज मित्र'पासून ते गुजरातच्या 'फ्लेमिंगो सिटी'पर्यंत अनेक प्रेरणादायी यशोगाथांचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी हे अधोरेखित केले की, जेव्हा सामान्य नागरिक निसर्ग रक्षणासाठी एकत्र येतात, तेव्हाच मोठे बदल शक्य होतात.