देशातील मुस्लिम मुलींना 'स्वच्छ भारत मोहिमे'नं मोठा दिलासा मिळाला :PM मोदी

pm-modi
pm-modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अलीगड मुस्लिम युनिवर्सिटीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला. देशाच्या विकासात AMU च्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. यासोबतच त्यांनी  "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" या नाऱ्याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. देशात जे काही आहे त्यावर देशातील प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. राज्य घटनेने आपल्याला तो अधिकार दिला आहे, असे मोदींनी म्हटले आहे. 

यापूर्वी देशात अनेक मुस्लिम मुलींना शाळेतील असुविधेमुळे शिक्षण सोडावे लागायचे.  शौचालय नसल्यामुळे जवळपास 70 मुस्लिम विद्यार्थीनींना शिक्षण सोडायच्या. स्वच्छ भारत मोहिमेनं हे प्रमाण कमी झाले. सध्याच्या घडीला केवळ 30 टक्केच प्रमाण घटल्याचे दिसते, असा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केला. 

मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, समाजात वैचारिक मतभेद असतात. परंतु जेव्हा देशाची वेळ येते तेव्हा सर्वांनी एकजूटता दाखवायला हवी. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्व धर्मियांनी एकता दाखवून योगदान देणं गरजेचे आहे. सत्ता ही समाजाचा एक भाग आहे. समाजासाठी आपल्याला सदोदित काम करत रहायचे आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना काही तत्व अडचणीची वाटतात. त्याचा सामना सर्वच समाजाला करावा लागतो. आपल्याला याचे पुढे जाऊन आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com