

Rahgiri Anand Utsav Ujjain 2026
sakal
उज्जैन : उज्जैनमध्ये आयोजित 'राहगिरी आनंद उत्सव २०२६' मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सहभागी होऊन हा सोहळा शेतकरी बांधवांना समर्पित केला. आनंदाची नगरी असलेल्या उज्जैनमध्ये या निमित्ताने योग, पारंपारिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी उज्जैनच्या कोठी रोडवर दीप प्रज्वलन करून आणि शंखनाद करून या उत्सवाचा शुभारंभ केला. "उज्जैन आता उत्सवांची राजधानी बनले आहे," असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.