rahul gandhi
sakal
नवी दिल्ली: गुजरातमध्ये दलित व आदिवासींवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. ‘‘भाजप सरकारच्या कार्यकाळात तिरस्कार, भेदभाव व हिंसाचार सातत्याने वाढत चालला आहे,’’ असा दावा गांधी यांनी रविवारी समाज माध्यमातून केला.