Bharaj Jodo Yatra : 'मीडियावाले विचारतात थंडी वाजत नाही का?' राहुल गांधींनी दिलं चोख उत्तर

Bharaj Jodo Yatra new delhi
Bharaj Jodo Yatra new delhiesakal

नवी दिल्लीः हरियाणा येथून भारत जोडो यात्रा दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. राहुल गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन यात्रेला संबोधित केलं. यावेळी यांनी केंद्र सरकारवर आणि माध्यमांवर आसूड ओढला.

राहुल गांधी म्हणाले की, मी देशामध्ये आतापर्यंत दोन हजार किलोमीटर फिरलो परंतु मला कुठंही हिंसा, द्वेष दिसला नाही. परंतु हे टीव्हीवाले २४ तास हिंसा पसरवित आहेत. जसा खिसेकापू सुरुवातीला आपलं लक्ष दुसरीकडे नेतो, तसंच हे मीडियावाले तुमचा खिसा कापून लक्ष दुसरीकडे वळवत आहेत.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पुढे बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, मीडियावाले मला विचारतात मला थंडी वाजत नाही का? परंतु हाच प्रश्न ते शेतकऱ्यांना का विचारत नाहीत? शेतीत, कंपन्यांमध्ये काम करणारे मजूर यांना हे विचारला जात नाही, हे दुर्दैव आहे. यांना २४ तास फक्त हिंदू-मुस्लिम वाद पाहिजे.

Bharaj Jodo Yatra new delhi
China Corona Video : प्रेतांचा खच, ऑक्सिजनही संपलं; चीनमधला झोप उडवणारा व्हीडिओ

''हिंदू धर्म आणि देवदेवता भिऊ नका, असं सांगतात. परंतु हे भाजपवाले भीतीचं वातावरण तयार करीत आहे. माझ्या यात्रेमध्ये तुम्हाला भीती, हिंसा, धर्म, जात, भेदभाव काहीच दिसलं नसेल. कारण ही यात्राच भीती दूर करण्यासाठी आहे.''

सगळ्या कंपन्या त्यांच्या, रेल्वे त्यांची, लाल किल्ला त्यांचा...सर्व त्यांचंच आहे. परंतु आमचं सत्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी आहे. आम्ही देशाचा तिरंगा श्रीनगरमध्ये जावून फडकवणार असल्याचं राहुल यांनी स्पष्ट केलं. ही यात्रा ३ जानेवारीपासून पुन्हा सुरु होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com