Operation Sindoor Sakal
देश
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये, किती विमाने गमावली? : राहुल गांधी
Rahul Gandhi : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती लढाऊ विमाने गमावली आणि पाकिस्तानला हल्ल्यापूर्वी माहिती का दिली, असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केला आहे.
नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान किती लढाऊ विमाने गमावली, असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या कथित वक्तव्याचा हवाला देत पाकिस्तानला हल्ल्यापूर्वी सरकारने माहिती का दिली, अशी विचारणाही त्यांच्याकडून करण्यात आली.

