
या पैशात कोरोनामुळे संकटात आलेल्या कुटुंबियांची मदत करता आली असती. प्रत्येक कुटुंबियांना 20-20 हजार रुपये देता आले असते, असा उल्लेखही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केलाय.
भाजप सरकार प्रत्येक वेळी विकासाचा पाढा वाचत असताना दुसरीकडे विरोधी पक्षाकडून विकासाचा ढोल खोटा ढोल वाजवला जात असल्याची टीका होत असते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या विकासाच्या मुद्यावर टीका केली आहे. मोदी सरकारच्या काळात विकास केवळ मोठ्या उद्योगपतींचाच झाला. काही उद्योगपतींची कर्जे या सरकारने माफ केली आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय.
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. मोदी सरकारने 2378760000000
रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगपतींचे कर्ज माफ केले. या पैशात कोरोनामुळे संकटात आलेल्या कुटुंबियांची मदत करता आली असती. प्रत्येक कुटुंबियांना 20-20 हजार रुपये देता आले असते, असा उल्लेखही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केलाय.
2378760000000
रुपय का क़र्ज़ इस साल मोदी सरकार ने कुछ उद्योगपतियों का माफ़ किया।इस राशि से कोविड के मुश्किल समय में 11 करोड़ परिवारों को 20-20 हज़ार रुपय दिए जा सकते थे।
मोदी जी के विकास की असलियत!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 31, 2020