भारत एकसंध, राहुल गांधींनी पाकिस्तानात 'भारत जोडो यात्रा' करावी : CM हिमंता सरमा

या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पाच महिने सर्व राज्यांमध्ये पदयात्रा काढणार आहेत.
Himanta Biswa Sarma vs Rahul Gandhi
Himanta Biswa Sarma vs Rahul Gandhiesakal
Summary

या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पाच महिने सर्व राज्यांमध्ये पदयात्रा काढणार आहेत.

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) 'भारत जोडो यात्रे'वर (Bharat Jodo Abhiyan) जोरदार हल्लाबोल केलाय. सरमा यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधत ही यात्रा पाकिस्तानात (Pakistan) करावी. कारण, भारत एकसंध आहे, तो कधीही तुटलेला नाही, असं त्यांनी म्हटलंय.

काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?

काँग्रेसचे माजी नेते आणि आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलंय की, "1947 मध्ये काँग्रेस अंतर्गत भारताची फाळणी झाली होती. आता काँग्रेसनं 'भारत जोडो यात्रे'साठी पाकिस्तानात जावं. राहुल गांधींनी ही यात्रा पाकिस्तानात नेली पाहिजे. कारण, संपूर्ण भारत एकसंध आहे."

Himanta Biswa Sarma vs Rahul Gandhi
Umesh Katti : भाजपनं गमावला आणखी एक मंत्री; उमेश कत्तींचं Heart Attack ने निधन

आजपासून काँग्रेस पक्षाची 'भारत जोडो यात्रा' सुरू होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज (बुधवार) दक्षिणेतील कन्याकुमारी येथून या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. तिथून हा प्रवास सुरू होऊन काश्मीरपर्यंत जाईल. ही एक पदयात्रा असेल, जी देशभरातून जाणार आहे. या यात्रेची काँग्रेस पक्षात अनेक दिवसांपासून तयारी सुरूय. राहुल गांधी आज या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

Himanta Biswa Sarma vs Rahul Gandhi
भारतीय वंशाच्या खासदाराला निष्ठेचं मिळालं फळ, ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी Suella Braverman यांची वर्णी

काँग्रेसची पाच महिने चालणार 'पदयात्रा'

या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पाच महिने सर्व राज्यांमध्ये पदयात्रा करणार आहेत. या पाच महिन्यांत 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. या संपूर्ण प्रवासाचं एकूण अंतर सुमारे 3500 किलोमीटर असेल. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू होईल आणि तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोटमार्गे उत्तरेकडं जाईल आणि शेवटचा टप्पा जम्मू आणि श्रीनगरमध्ये संपणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com