नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महागाईवरून केंद्र सरकारला धारेवर धरताना महागाईमुळे जनता आर्थिक दबावाखाली असल्याचा आरोप केला. .वाहनांची, मोबाईलची विक्री घटल्याची आकडेवारी आणि कर्ज वाढल्याचा दावा करून राहुल गांधींनी मोदी सरकारवर शरसंधान केले. सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटले, की मागील एक वर्षात दुचाकींची विक्री १७ टक्क्यांनी, चारचाकी वाहनांची (कारची) विक्री ८.६ टक्क्यांनी घटली आहे. तर, मोबाईलची विक्री देखील ७ टक्क्यांनी कमी झाली आहे. .दुसरीकडे खर्च आणि कर्ज या दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झाली आहे. घरभाडे, शिक्षणाचा खर्च, दैनंदिन खर्च सर्व गोष्टींची महागाई वाढली आहे. ही केवळ आकडेवारी नाही तर त्या आर्थिक दबावाची वस्तुस्थिती आहे, ज्याचे ओझे प्रत्येक सर्वसामान्य भारतीयांवर आहे..आपल्याला इव्हेटच्या चमकदारपणाशी नव्हे तर सर्वसामान्यांच्या जगण्याच्या वस्तुस्थितीशी संबंधित राजकारण हवे आहे. सर्वसामान्यांसाठी काम करणारी अर्थव्यवस्था आपल्याला हवी आहे, असाही टोला राहुल गांधींनी लगावला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.