rahul gandhi
sakal
बोकाजन (आसाम): हिमंता बिस्वा सरमा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह आसाममध्ये ‘जमीन एटीएम’ चालवतात, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आरोप केला. आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.