
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये शिक्षण क्षेत्रातील जातिभेद संपविण्यासाठी रोहित वेमुला कायदा तयार करावा असे आवाहन काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारला केला आहे. यासाठी राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठविले असून त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संघर्षाचाही उल्लेख केला आहे.