Ashwini Vaishnaw: वाजपेयींचे सचिव ते मोदींचे खास मंत्री, जाणून घ्या IAS ऑफिसरचा रेल्वेमंत्री बनण्याचा प्रवास

Ashwini Vaishnaw Lifestory: 2014 मध्ये एनडीए सरकारचे चौथे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी नरेंद्र मोदींचा विश्वास जिंकलाय
Railway Minister Ashwini Vaishnaw Journey
Railway Minister Ashwini Vaishnaw Journey esakal

Railway Minister Journey : ओडिसा कॅडरचे माजी आयएएस अश्विनी वैष्णव यांनी काही वर्षांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला आणि सध्याच्या मंत्रिमंडळात रेल्वे आणि दळणवळण यासारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळत आहेत.

2014 मध्ये एनडीए सरकारचे चौथे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी नरेंद्र मोदींचा विश्वास जिंकलाय. वैष्णव याआधी अटलबिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिवही राहिले आहेत.

जोधपूरमध्ये राजस्थान येथे जन्मलेल्या अश्विनी वैष्णव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत आणि 1994 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते अखिल भारतीय स्तरावर 27 व्या क्रमांकावर होते.

यानंतर त्यांनी ओडिसाच्या बालासोर आणि कटक जिल्ह्याचे डीएम म्हणून काम केले. 1999 मध्ये आलेल्या भीषण चक्रीवादळात त्यांनी जबाबदार अधिकारी म्हणून आपल्या कौशल्याची ओळख करून दिली आणि त्यांच्या माहितीच्या आधारे सरकार जलद पावले उचलू शकले, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.

मात्र २००८ मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि अमेरिकेच्या विश्वविद्यालयात MBA चा अभ्यास करण्यासाठी निघाले. MBA केल्यानंतर त्यांनी काही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. आणि त्यानंतर गुजरातमध्ये ऑटो अॅक्सेसरीजचे उत्पादन युनिट सुरू केले.

28 जून 2019 रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या सहा दिवस आधी वैष्णव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर वैष्णव यांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवून लोकांना आश्चर्यचकित केले होते. (Narendra Modi)

Railway Minister Ashwini Vaishnaw Journey
PM Narendra Modi : विकसित भारतासाठी टीम म्हणून काम करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

एनडीएने केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर 2014 मध्ये डीव्ही सदानंद गौडा रेल्वेमंत्री झाले. गौडा रेल्वेमंत्री असताना गोरखधाम एक्स्प्रेसची एका थांबलेल्या मालगाडीला धडक बसून अपघात झाला.

या अपघातात सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला. 9 नोव्हेंबर 2014 रोजी सुरेश प्रभू एनडीए सरकारचे दुसरे रेल्वे मंत्री बनले. प्रभू यांच्या कार्यकाळात तीन मोठे रेल्वे अपघात झाले.

Railway Minister Ashwini Vaishnaw Journey
Railway Accidents : देशात गेल्या पाच ते सहा दशकांत घडलेले भीषण अपघाताचे धक्के!

सप्टेंबर 2017 मध्ये सुरेश प्रभू यांच्या जागी पीयूष गोयल यांना रेल्वेमंत्री बनवण्यात आले. गोयल जुलै 2021 पर्यंत रेल्वे मंत्री राहिले आणि त्यांच्या कार्यकाळात एकही मोठा अपघात झाला नाही. यानंतर जुलै 2021 पासून रेल्वे मंत्रालयाची कमान अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com