Mahatma Gandhi : गांधींच्या वारशाला सत्ताधाऱ्यांचा धोका, राष्ट्रपित्याच्या मारेकऱ्यांचे केंद्र सरकारकडून गौरवीकरण : सोनिया गांधी

Legacy Of Gandhi : सोनिया गांधी यांनी दिल्लीत सत्तारूढ पक्षाकडून महात्मा गांधी यांच्या विचारावर हल्ला करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, गांधींच्या हत्यारांना गौरवण्याचा संदर्भ दिला.
Mahatma Gandhi
Mahatma GandhiSakal
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शंभर वर्षांपूर्वी बेळगाव येथे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली होती. परंतु आज महात्मा गांधी यांच्या वारशावर दिल्लीत सत्तारूढ पक्षाकडून हल्ला करण्यात येत आहे. ज्यांनी महात्मा गांधी यांच्या विचाराला कडवट विरोध केला व त्यांची हत्या केली त्यांचे गौरवीकरण केले जात असल्याचा आरोप काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com