कोरोनाच्या रौद्र रुपाला दहा राज्ये कारणीभूत

राज्य सरकारे, केंद्र सरकार कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, ऑक्सिजन, औषधांची कमतरतेपुढे सर्वजण हतबल झाल्याचे चित्र देशात आहे.
Coronavirus
CoronavirusSakal

नवी दिल्ली - देश (India) कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना दुसऱ्या लाटेनेही (Second Wave) रौद्र रुप धारण केले आहे. नव्या रुग्णांचे आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे (Death) प्रमाणही वाढत आहे. अशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांसह दहा राज्ये कोरोना रुग्णवाढीला (Patient) कारणीभूत ठरत असल्याचा ठपका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central health Ministry) ठेवला आहे. दरम्यान, मे महिना हा कसोटीचा असून, रुग्णवाढ दररोज आठ लाखांवर जाणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. (states are responsible for the coronary heart disease)

राज्य सरकारे, केंद्र सरकार कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, ऑक्सिजन, औषधांची कमतरतेपुढे सर्वजण हतबल झाल्याचे चित्र देशात आहे. परिणामी, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. देशातील रुग्णांची संख्या दोन कोटी दहा लाखांवर गेली आहे. मे महिन्यात या संख्येत खूप वाढ होणार असून, दररोज नव्या रुग्णांचा आकडा आठ लाखांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यू दर कमी होत असून तो सध्या १.०९ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

Coronavirus
'स्पुटनिक लाइट' ८० टक्के कार्यक्षम; नव्या स्ट्रेन्सवरही प्रभावी - रशिया

देशभरात सतरा कोटींहून अधिक जणांचे लसीकरण झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले असले, तरी संशोधन संस्थांकडून दररोज धोक्याचे इशारे देण्यात येत आहेत. कोरोनाचा ब्रिटनमध्ये सापडलेला विषाणू आता उत्तर भारताला विळखा घालू लागला आहे, तर दुहेरी बदलाचा विषाणू हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यात आढळू शकतो, असे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक सुजीत सिंग यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूंचे बदलते रुप, त्यामुळे वाढणारा संसर्ग लक्षात घेता संशोधन संस्थांनी याची माहिती विविध राज्यांना दिली आहे. सध्याचा विषाणू आणि त्यांत होणाऱ्या बदलांमुळे संसर्गाचा वेग वाढू शकतो म्हणून ज्या राज्यात त्याचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यावर लक्ष ठेऊन सार्वजनिक आरोग्याच्या उपायायोजना कारण्याची गरज सजीत सिंग यांनी व्यक्त केली आहे.

ही राज्ये जबाबदार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्ण वाढीला दहा राज्यांना जबाबदार धरले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, हरियाना, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान ही ती दहा राज्ये आहेत. देशातील ७२.१९ टक्के रुग्ण याच राज्यांमध्ये आहेत. यातील एकट्या महाराष्ट्रात आज ५७ हजार ६४० नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. कर्नाटकात ५१ हजार ११२, केरळात ४१ हजार ९५३ रुग्ण सापडले आहे. या राज्यांत दररोज रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी कठोर निर्बंध लावण्याची वेळ येणार आहे.

एकूण तुलनेत

  • केवळ १० राज्यांमध्ये ७२.१९ टक्के रुग्ण

  • केवळ १२ राज्यांमध्ये ८१.०५ टक्के सक्रीय रुग्ण

  • आतापर्यंतचे लसीकरण १६.२५ कोटी डोस

  • १० राज्यांमध्ये मिळून ६६.८७ टक्के डोस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com