

Government Cracks Down on Rumours During Char Dham Yatra
esakal
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी २०२६ च्या चारधाम यात्रेसाठी आतापर्यंतचा सर्वात कडक आणि व्यापक 'ॲक्शन प्लॅन' तयार केला आहे. यात्रेकरूंची सुरक्षा आणि सुविधा ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून ती आमची 'वैयक्तिक जबाबदारी' आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे.सचिवालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, यंदाची यात्रा व्यावसायिक दृष्टिकोनातून नाही तर 'मानवीय संवेदनशीलतेने' पार पाडली जाईल.