Sudan Crisis : भारतीयांच्या सुटकेसाठी ‘इंडिगो’चा पुढाकार; २३१ भारतीय मायदेशी परतले

सैन्यातील दोन गटात सुरू असलेल्या हिंसक संर्घषात सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने २४ एप्रिलपासून ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम सुरू केली.
Operation Kaveri Campaign
Operation Kaveri Campaignsakal
Summary

सैन्यातील दोन गटात सुरू असलेल्या हिंसक संर्घषात सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने २४ एप्रिलपासून ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम सुरू केली.

नवी दिल्ली - सैन्यातील दोन गटात सुरू असलेल्या हिंसक संर्घषात सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने २४ एप्रिलपासून ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम सुरू केली असून या मोहिमेत इंडिगो एअरलाईननेही भाग घेतला असून त्यांच्या विमानातून २३१ भारतीय जेद्दाहहून दिल्लीला पोहोचले.

परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. या पाचव्या विमानफेरीतून सोळाशे भारतीय सुदानहून सुरक्षितपणे मायदेशी परतले आहेत. ‘इंडिगो’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारच्या मोहिमेला हातभार लावण्यास कंपनी कटिबद्ध आहे. या काळात मानवतावादी गरज पूर्ण करण्यासाठी एअरलाइनचे कर्मचारी पुढे सरसावले असून अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांकडे आणि घरांपर्यंत सुरक्षित परत आणणे शक्य होणार आहे.

मुरलीधरन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘ऑपरेशन कावेरी’मध्ये इंडिगो सहभागी झाली आहे.२३१ भारतीय जेद्दाहहून विमानातून दिल्लीला पोहचले आहेत. या पाचव्या विमानफेरीतून सुमारे सोळाशे जण भारतात परतले आहेत किंवा परतत होते. त्यांना शुभेच्छा. आमची मोहीम सुरूच राहील.

‘आयएनएस सुमेधा’ची अखंड सेवा

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंदम बागची म्हणाले, ‘‘पोर्ट सुदान येथे तैनात असलेल्या आयएनएस सुमेधातून ३०० प्रवासी जेद्दाहला येत आहेत. ‘आयएनएस सुमेधा’तून जेद्दाहला येणारी भारतीयांची ही तेरावी तुकडी आहे.

अंधारी धावपट्टीवर धाडसी मोहीम

संघर्षग्रस्त सुदानमधून भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन कावेरी’अंतर्गत हवाई दलाने गुरुवार (ता.२७) आणि शुक्रवारी (ता.२८) मोठे धाडस दाखविले. सुदानची राजधानी खार्तुमपासून ४० किलोमीटर अंतरावरील वाडी सय्यिदना येथील छोट्या धावपट्टीवर कोणत्याही मदतीविना आणि प्रकाशाविना हवाई दलाचे ‘सी-१३०जे’ विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. तेथून १२१ लोकांचा बचाव केला. यात एक गर्भवतीचाही समावेश आहे.

कॅप्टन रवी नंदा यांचे साहस

हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाडी सय्यिदना आणि जेद्दाहमधील सुमारे अडीच तासांच्या या साहसी मोहिमेची नोंद हवाई दलाच्या इतिहासात घेतली जाईल. ही मोहीम ‘काबूल ऑपरेशन’ सारखीच होती. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आल्यानंतर भारतीय हवाई दलाने काबूलमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी अगदी अशीच मोहीम आखली होती. संरक्षण दलाच्या सूत्रांच्या माहितीनुसार ग्रुप कॅप्टन रवी नंदा हे मोहिमेत सहभागी ‘सी१३०जे’ या विमानाचे कॅप्टन होते. ‘ऑपरेशन देवी शक्ती’अंतर्गत अफगाणिस्तानमधून भारतीयांचा बचाव केल्याच्या कामगिरीबद्दल नंदा यांनी शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com