नवी दिल्ली - चालू हंगामाअखेर २८० लाख टन नव्या साखरेचे उत्पादन अपेक्षित असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात ३९ लाख टनांची घट होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तविला आहे..गतवर्षीच्या हंगामात ३१९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा सरासरी साखर उताऱ्यात ०.२५ टक्क्याने घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत २९ कारखान्यातून गाळप सुरु न झाल्यामुळे आतापर्यंतचे साखर उत्पादन १३.५० लाख टनांची घटले आहे. त्यामुळे हंगामाअखेर एकूण साखर उत्पादनात सुमारे ३९ लाख टनांची घट अपेक्षित असल्याचे महासंघाने म्हटले आहे..देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून १५ डिसेंबरअखेर ७२० लाख टन उसाचे गाळप तसेच सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण ६१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. २८० लाख टन नव्या साखरेच्या उत्पादनाशिवाय ४० लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली..साखर उद्योगाच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नांपैकी साखरेच्या किमान विक्री दरातील वाढ आणि साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरातील वाढ हे दोन प्रश्न मार्गी लागले असून त्यावर पुढील दोन -तीन आठवड्यात निर्णय होणे अपेक्षित असल्याचे महासंघाने म्हटले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
नवी दिल्ली - चालू हंगामाअखेर २८० लाख टन नव्या साखरेचे उत्पादन अपेक्षित असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात ३९ लाख टनांची घट होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तविला आहे..गतवर्षीच्या हंगामात ३१९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा सरासरी साखर उताऱ्यात ०.२५ टक्क्याने घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत २९ कारखान्यातून गाळप सुरु न झाल्यामुळे आतापर्यंतचे साखर उत्पादन १३.५० लाख टनांची घटले आहे. त्यामुळे हंगामाअखेर एकूण साखर उत्पादनात सुमारे ३९ लाख टनांची घट अपेक्षित असल्याचे महासंघाने म्हटले आहे..देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून १५ डिसेंबरअखेर ७२० लाख टन उसाचे गाळप तसेच सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण ६१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. २८० लाख टन नव्या साखरेच्या उत्पादनाशिवाय ४० लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली..साखर उद्योगाच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नांपैकी साखरेच्या किमान विक्री दरातील वाढ आणि साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरातील वाढ हे दोन प्रश्न मार्गी लागले असून त्यावर पुढील दोन -तीन आठवड्यात निर्णय होणे अपेक्षित असल्याचे महासंघाने म्हटले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.