

नवी दिल्ली: ‘‘काही भरकटलेल्या युवकांनी दगडफेक केली तरी त्यांना शांत करण्याचा व समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिस आणि सुरक्षा संस्थांनी केला पाहिजे. दुसरीकडे सरकारनेदेखील आक्रमक भूमिका घेणे टाळावयास हवे,’’ असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, राज्य सरकारांसह कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या संस्थांना आज दिला. युवकांचे म्हणणे ऐकून घेणे हे सर्वांत मोठे शस्त्र असल्याची टिप्पणीदेखील खंडपीठाने केली.