

Justice Joymalya Bagchi
esakal
नवी दिल्ली : सोशल मीडिया, त्यावरील अल्गोरिदम आणि मीडिया ट्रायलमुळे न्यायव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याची चिंता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियामुळे निष्पक्ष न्यायाला धक्का बसत असून न्याय प्रक्रिया आता 'लाइक्स'च्या बाजारात पोहोचली आहे, असे ते म्हणाले. १ ऑगस्ट रोजी CAN फाउंडेशनने आयोजित केलेल्या पाचव्या जस्टिस एच. आर. खन्ना स्मृती राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते.