
कोची : केरळमध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून नागरिकांवरील या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने त्यांना ठार मारण्याची परवानगी मिळावी म्हणून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याच्या तयारीत आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकांना रेबीज झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतचा एक विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असून त्यावर २८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणे अपेक्षित आहे. स्थानिक प्रशासनमंत्री एम.बी. राजेश यांनी आज ही माहिती दिली.
याच भटक्या कुत्र्यांनी सोमवारी एका महिलेला चावा घेतला होता. कुत्र्याने चावा घेतल्याने मध्यंतरी एका बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता त्यावरून एका स्थानिक वकिलाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.
राज्य सरकारने श्वानदंशाच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी २०१६ मध्ये न्या. सीरिजन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला होता. श्वान दंशाचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून राज्य सरकारने लहान मुलांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. आता लहान मुलांना तोंडावाटे लस देण्याचाही राज्य सरकार गांभीर्याने विचार करते आहे.
कुत्र्यांमुळे वाढता धोका
लहान मुलांवरील कुत्र्यांचे हल्ले वाढले
अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
राज्यातील रेबीजच्या रुग्णांत मोठी वाढ
दुचाकी स्वारांवर हल्ले
भटक्या कुत्र्यांमधील आक्रमकपणा वाढला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.