
नवी दिल्ली : ‘वक्फ बोर्डामध्ये गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश केला जाईल असे सुधारित कायद्यात म्हटले आहे; असे असेल तर मग मुस्लिमांना देखील हिंदू धार्मिक विश्वस्त मंडळाचा भाग बनण्याची परवानगी आपण देणार आहात का?,’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला केला. वक्फ कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाबाबत कोर्टाकडून चिंता व्यक्त करण्यात आली.