
नवी दिल्ली : बिहारमधील मतदार याद्यांच्या पडताळणीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर येत्या गुरुवारी सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून येत्या २६ तारखेपासून ही मोहीम सुरू होणार आहे.