
नवी दिल्ली : ‘‘बेकायदा बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय धाडसी आहे, आम्ही त्या निर्णयाचे कौतुक करतो,’’ असे म्हणत ठाणे येथे हरित क्षेत्रात उभारण्यात आलेली १७ बेकायदा बांधकामे पाडण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.