मॉन्सूनचा पुढील प्रवास वेगाने होणार, कारण...

Monsoon
Monsoon

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवासास पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरापर्यंत हजेरी लावलेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवास वेगाने होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.(The travel of southwest monsoon creates a conducive environment)

बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. पुढील चोवीस तासांमध्ये त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Monsoon
राजगडावर सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळात ओडिशा, पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्यावर धडकेल. या वादळामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा जोर वाढला आहे. सद्यःस्थितीत श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर मॉन्सून दाखल झाला आहे.

सामान्यतः केरळमध्ये एक जूनला मॉन्सून दाखल होतो. यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे आणि आता पाठोपाठ बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती वाढली आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिली.

महाराष्ट्रात दरवर्षी सह जूनच्या दरम्यान मॉन्सून तळ कोकणात हजेरी लावतो. यंदा नियमित वेळेच्या आधी बरसेल, असेही काही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

Monsoon
पुणे : महापालिकेच्या 65 केंद्रांवर लसीकरण

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

अरबी समुद्रातील चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरात दुसरे चक्रीवादळ तयार होत होते. तेथे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे रूपांतर आता तीव्र चक्रीवादळ होत आहे. त्यामुळे ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतील. या किनारपट्टीवर प्रतितास ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सोमवारी (ता. २४) सायंकाळपर्यंत त्याचा वेग ११० किलोमीटर जाईल. मंगळवारी चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाऊन ताशी १७० किलोमीटरपर्यंत, तर बुधवारी ताशी १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हे कमी दाबाचे क्षेत्र अंदमानातील पोर्ट ब्लेअरपासून उत्तरेकडे ५६० किलोमीटर, ओडिशातील पॅरादीपपासून आग्नेयेकडे ५९० किलोमीटर, बलासोरेपासून आग्नेयेकडे ६९० किलोमीटर, पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० किलोमीटर अंतरावर होते. या चक्रीवादळाच्या वाढत्या तीव्रतेमुळे दोन ते तीन दिवस कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच किनारी भागातही राहू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com