लाईव्ह न्यूज

Minister Jaishankar: शेजारी देशांशी संबंध नेहमी सुरळीत नसतात: परराष्ट्रमंत्री जयशंकर; सामूहिक हितसंबंधांच्या पायाभरणीचे प्रयत्न

Ties with Neighbours Not Always Smooth : भारतासोबत सहकार्य केल्यास फायदा होतो, विरोध केल्यास किंमत मोजावी लागते, हा तर्क प्रत्येक शेजारी देशाने लक्षात घ्यायला हवा. यात काहीजणांना वेळ लागतो तर काहीजण लवकर ओळखतात. पाकिस्तानची ओळख लष्कराच्या आधिपत्याखाली असून शत्रुत्वावर आधारित आहे.
S. Jaishankar
S. Jaishankarsakal
Updated on: 

नवी दिल्ली : ‘‘शेजारी देशांशी संबंध कायम सुरळीत राहतीलच, असे अपेक्षित करता येत नाही. मात्र, भारतात कोणतेही सरकार सत्तेत असो, या संबंधांमध्ये स्थैर्य टिकवण्यासाठी सामूहिक हितसंबंधांची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला आहे,’’ असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. ‘डीडी इंडिया’ तर्फे आयोजित संवादात ते बोलत होते. या संवादाची लिंक त्यांनी ‘एक्स’वर शेअर केली आहे. सामारिक तज्ज्ञासोबत त्यांनी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com