
आगरताळा : त्रिपुरा सरकारने केवळ औद्योगिक वापरासाठी राज्यातील बांबू उत्पादनात शंभरपट वाढ करण्यासाठी पंचवार्षिक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत येत्या पाच वर्षांत बांबूचे सध्याचे ४६१.३२ हेक्टर क्षेत्र शंभरपटीने वाढवून ४५ हजार हेक्टरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशात अगरबत्तीसाठी लागणाऱ्या बांबूच्या काड्यांपैकी ७० टक्के उत्पादन एकट्या त्रिपुरात होते.