नवी दिल्ली : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना "चांद्रयान 2'मधील विक्रम लॅंडरचा "इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. असे असले तरीही इस्रोच्या कामगिरीचे, त्यांच्या प्रयत्नांचे सोशल मीडियावर तोंडभरुन कौतुक केले जात आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची मोहीम भारताने आखली होती. ही मोहीम यशस्वी झाली असती तर या भागात यान उतरविणारा भारत पहिलाच देश ठरला असता. चंद्रावर यान उतरविण्याची किमया यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांनी केली आहे. त्यातही दक्षिण ध्रुवावर यान उतरविणे एकाही देशाला शक्य झाले नव्हते.
कोणत्याच देशाने दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा मानस ठेवला नव्हता, आपण तेच केलं. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे,'' अशा शब्दांत इस्रोचे कौतुक करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.