

CM Yogi Adityanath
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी घोषणा केली की, राज्य सरकार लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मुस्तफाबाद गावाचे नाव बदलून 'कबीरधाम' करण्यासाठीचा प्रस्ताव आणेल. संत कबीर यांच्याशी जोडलेल्या या परिसराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख या बदलामुळे पुन्हा स्थापित होईल, असे त्यांनी सांगितले.