Yogi Adityanath : औरंगजेबाची मोठी घोडचूक काय होती? वीर बाल दिवसानिमित्त योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल!

Veer Bal Diwas : वीर बाल दिनानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शीख गुरूंच्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देत इतिहासाकडे मूल्याधारित दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश दिला. नव्या पिढीसाठी शौर्य, समर्पण आणि सामाजिक समरसतेची प्रेरणा या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.
Yogi Adityanath on History, Sacrifice and Values

Yogi Adityanath on History, Sacrifice and Values

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : इतिहास हा त्याग आणि बलिदानाचा असतो, अत्याचाराचा नाही, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केले. ‘वीर बाल दिवस’ानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी मुघल बादशहा औरंगजेबावर तीव्र टीका केली. औरंगजेब स्वतःला हिंदुस्थानचा बादशहा म्हणवून घेत होता, पण ती त्याची मोठी चूक होती, असे ते म्हणाले. आज देशात त्याचे नाव घेणारे फारसे कोणी उरलेले नाही, तसेच त्याच्या थडग्यालाही कोणी विचारत नाही, असा टोला त्यांनी लगावला. गुरु तेग बहादूर यांना आव्हान देणे ही औरंगजेबाची मोठी घोडचूक ठरली, कारण त्यांच्या तेजासमोर क्रूरता टिकू शकत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

https://x.com/myogiadityanath/status/2004470761839644765

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com