
नवी दिल्ली : बैलजोडीअभावी स्वतः औत ओढून शेत नांगरणाऱ्या हडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या विपन्नावस्थेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. कृषीसाठीच्या सरकारी योजनांचा लाभ न मिळणे हे अंबादास पवार यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन मानताना आयोगाने याप्रकरणात लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणात दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.