Farmer Human Rights Case : ‘त्या’ शेतकऱ्याची मानवाधिकार आयोगाकडून दखल, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस; दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे आदेश

NHRC Action on Farmer Issue : बैलजोडी आणि सरकारी मदतीअभावी स्वतः औत ओढणाऱ्या लातूरच्या अंबादास पवार यांच्यावर झालेल्या अन्यायाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
Agriculture News
Human Rights Commission Issues Notice to Latur Collectoresakal
Updated on

नवी दिल्ली : बैलजोडीअभावी स्वतः औत ओढून शेत नांगरणाऱ्या हडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या विपन्नावस्थेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. कृषीसाठीच्या सरकारी योजनांचा लाभ न मिळणे हे अंबादास पवार यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन मानताना आयोगाने याप्रकरणात लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणात दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com