
नवी दिल्ली : बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी लोकसभेमध्ये झालेली चर्चा वादळी ठरली. सरकारने हे विधेयक कोणत्याही धार्मिक संस्थेत हस्तक्षेप करण्यासाठी नाही आणि वक्फच्या जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी नाही, असा दावा सरकारने केला. तर हे विधेयक राज्यघटना दुबळी करणारे, अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारे, सामाजिक भेदभाव वाढविणारे असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षांनी केला.