सपा, बसपाची आश्वासने आम्ही पूर्ण केली; राजनाथ सिंह

पूलवामा हल्ल्यानंतर बालाकोट सर्जिकल स्ट्राईकद्वारे प्रत्यूत्तर देण्यात आले.
rajnath-singh
rajnath-singhsakal
Summary

पूलवामा हल्ल्यानंतर बालाकोट सर्जिकल स्ट्राईकद्वारे प्रत्यूत्तर देण्यात आले.

झाशी : बहुजन समाज पक्ष (बसपा), समाजवादी पक्ष (सपा) यांची आश्वासने भाजप सरकारने(bjp government) पूर्ण केली, असा दावा करून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath sinh)यांनी हे दावे खोडून काढण्याचे आव्हानही दिले.

जन विश्वास यात्रेचा प्रारंभ त्यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते म्हणाले मोदी(narendra modi) यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात अभूतपूर्व काम झाले आहे. अनेक कायदेशीर अडथळे पार करून अयोध्येत राममंदिर(ram mandir) उभे राहात आहे. पूलवामा हल्ल्यानंतर बालाकोट सर्जिकल स्ट्राईकद्वारे(surgical strike) प्रत्यूत्तर देण्यात आले. उन्नत, विशाल, सार्वभौम भारत कदापी झुकणार नाही.

काँग्रेसच्या राजवटीतील २जी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, पशूखाद्य, युटीआय, आयपीएल असा एकही गैरव्यवहार भाजप सरकारच्या काळात झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. राजनाथ यांनी बुंदेलखंडच्या शौर्य आणि पराक्रमाची प्रशंसा केली. येथील माती आणि रक्तात शौर्य आणि सचोटी हे गुण समरस झाले आहेत.

आम्ही जनसंघाचा जाहीरनामा लिहायचो. त्यात ३७०वे कलम रद्द करू असे नमूद करायचो. लोक म्हणायचे की जनसंघ फक्त जाहीरनामे लिहितो, पण प्रत्यक्षात तसे खरोखरच कुणीही करणार नाही. केंद्रातील भाजपने हे करून दाखविले.

- राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com