भाजप 294 पैकी 300 जागा जिंकेल; यशवंत सिन्हांचा अमित शहांना टोला

yashwant sinha
yashwant sinha

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West bengal assembly election 2021) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यात हाय व्होल्टेज लढत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघाचा समावेश आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नंदीग्राममध्ये रॅली काढत आहेत. तर दुसरीकडे ममता बॅनर्जींचीसुद्धा रॅली आहे. भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या यशवंत सिन्हा यांनी अमित शहांवर निशाणा साधला आहे. अमित शहांनी भाजपला बंगालमध्ये 200 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला होता. यावरून आता यशवंत सिन्हा यांनी खोचक टोला लगावताना म्हटलं की, भाजप 294 पैकी 300 जागासुद्धा जिंकेल. 

राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर अमित शहा यांन पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेली अमित शहा यांनी असा दावा केला होता की, भाजप पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागा जिंकेल. त्यांच्या याच दाव्यावर यशवंत सिन्हा यांनी टीका केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भाजपने पहिल्या टप्प्यात 30 पैकी 26 जागा जिंकू असा दावा केला. याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानतो. माझ्या माहितीनुसार भाजप या 30 आणि 294 पैकी 300 जागा जिंकेल असा उपरोधिक टोला लगावणारे ट्विट यशवंत सिन्हा यांनी केलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनीही भाजपवर टीका केली आहे. भाजप सर्व जागा जिंकणार असा दावा का करत नाही, की बाकीच्या जागा काँग्रेस आणि इतर पक्षांना सोडल्या? या निवडणुकीत भाजपला रसगुल्लाच मिळेल. पहिल्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर भाजप असे दावे का करतंय हे समजण्यापलिकडे आहे. केंद्रीय संस्थांनी आता राहिलेल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत तटस्थपणे काम करावं, भाजपला मतदान देण्यासाठी लोकांना प्रवृत्त करू नये असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com