भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण?

Arvind-Kejriwal
Arvind-Kejriwal

नवी दिल्ली - भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण असा सवाल करत, एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास मोफत योजना कायम राहतील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले.

दिल्लीत ७० जागांसाठी येत्या शनिवारी (ता. ८) मतदान होत असून, ११ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. केजरीवाल यांनी मुलाखतीत म्हटले, की मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता दिल्लीकरांना आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. निकालातून ते ध्रुवीकरण यशस्वी झाले की नाही हे समजेल. ते म्हणाले, ‘आप’च्या मतदारांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, अत्याधुनिक रस्ते, चोवीस तास वीज हवी आहे. विधानसभा निवडणुकीमुळे भाजपने शाहिनबागच्या आंदोलकांना अद्याप हटविले नसल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला. गृहमंत्र्यांकडून आंदोलकांना हटवण्याबाबत अडवणूक का केली जात आहे, अमित शहांचे कोणते हित दडले आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आंदोलनावरूत ते घाणेरडे राजकारण करत आहेत. भाजपचे नेते दिल्लीतील बेकायदा कॉलनीला संपूर्णपणे विसरून गले आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. आप पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोफत योजना सुरूच राहतील आणि गरज भासल्यास आणखी योजना आणल्या जातील, असेही केजरीवाल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com