रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय सेवा होणार बंद! 

रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय सेवा होणार बंद! 

नवी दिल्ली - देशातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मिळणारी मोफत वाय-फाय सेवा आता बंद होणार आहे. रेल्वेने ज्यांच्याबरोबर २०१५ पासून या सुविधेची अंमलबजावणी सुरू केली होती त्या ‘गुगल’ने हा निर्णय जाहीर करताना, ४०० स्थानकांवर कंपनी टप्प्याटप्प्याने आपली वाय-फाय सेवा बंद करेल, असे स्पष्ट केले आहे. 

रेल्वे स्थानाकंवर मोफत वाय-फायची सुविधा देण्याची चमकदार घोषणा ‘रेलवे और रेलटेल’ यांच्या सहकार्याने अमलात आली होती. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना २०१५ पासून ४०० रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुरू झाली होती. प्रभू यांनीच त्याचे उद्‌घाटन केले होते. मात्र त्यात वाय-फायचा वापर करण्यासाठीचे पासवर्ड निरनिराळे असल्याने गाडीचा थांबा असण्याच्या काही मिनिटांच्या काळात ही सुविधा प्रवासी प्रत्यक्षात फार कमी वापरू शकतात, असेही दिसून आले होते. ‘डिजिटल इंडिया’मध्ये इंटरनेटचा वेग देशाच्या विविध भागांत वेगवेगळा असल्याची वस्तुस्थिती आहे. ग्रामीण, दुर्गम व समुद्रकिनाऱ्यांच्या भागात तर टू-जी इंटरनेट सेवा मिळतानाही अजून मारामार होत असल्याचा अनुभव आहे. तरीही रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय सुविधेला भारतातील लोकसंख्येच्या आकारमानामुळे चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले होते व भारताच्या धर्तीवर इतर देशांतही अशी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणाही या कंपनीने केली होती. 

एका अहवालानुसार भारतातील प्रत्येक इंटरनेट वापरकर्ता दरमहा सरासरी १० जीबी डेटा वापरतो व नजीकच्या काळात हे प्रमाण २० टक्‍क्‍यांच्याही पुढे जाण्याची शक्‍यता आहे. मात्र देशात ही सेवा एका झटक्‍यात बंद केली जाणार नसून ४०० स्थानकांवर टप्प्याटप्प्याने ती बंद केली जाईल, असे गुगलने स्पष्ट केले आहे. 

डाटा स्वस्त झाल्याने सेवा बंद 
‘गुगल’ने सुमारे पाच वर्षांपासून सुरू असलेली ही सेवा भारतात बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना, भारतात इंटरनेट डाटा अतिशय स्वस्त झाल्याने स्थानकांवर मोफत वाय-फायची गरज उरलेली नाही, असे कारण दिले आहे. एका अधिकृत ब्लॉगद्वारे ही घोषणा करताना गुगलने म्हटले आहे, की भारतात इंटरनेट तुलनेत खूपच स्वस्त झाल्याने देशातील प्रत्येक व्यक्ती सुलभतेने इंटरनेटचा वापर करतो. याशिवाय भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने (ट्राय) गेल्या पाच वर्षांत इंटरनेट डेटाच्या योजनांत ९० टक्‍क्‍यांहून जास्त कपात केली आहे. साहजिकच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मोफत वाय-फायची गरज संपल्याचे आमचे निरीक्षण आहे. त्यामुळे ही सेवा गुगल बंद करणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com