

उत्तर प्रदेश बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या निकालांनंतर अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी पत्र लिहिले आहे. "योगी की पाती" या नावाने प्रसिद्ध झालेल्या या पत्रात त्यांनी अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना खचून न जाता 'पुनश्च हरी ओम' करण्याचा मंत्र दिला आहे.
सोशल मीडियावर हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे.