- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
काही मुलं लहानपणापासूनच स्वतंत्र बाण्याचे असतात. पारंपरिक विचारांचे पालक अशा बंडखोर वाटू शकणाऱ्या मुलांना, ‘वाया गेला आहेस अगदी’ असे म्हणून, मुलांबद्दल कायम तक्रारी करत असतात. ‘अज्जिबात ऐकत नाही, स्वतःचेच खरे करतो.’ इ. बोल त्या बिच्चाऱ्या बालकाला सतत ऐकून घ्यावे लागतात.