मागील लेखांमध्ये आपण अभ्यास कसा करावा, स्पर्धा परीक्षांची तंत्रे याबद्दल माहिती घेतली. आता दहावी व बारावीनंतर काय करिअर निवडावे हे जाणून घेऊयात. सर्व मुलींनी व पालकांनी तीन गोष्टींचा विचार करावा.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अनेकदा मैत्रीण जाते म्हणून ‘मी तेथे प्रवेश घेईल,’ असे ठरवले जाते. हे अंधानुकरण आहे. म्हणून प्रॅक्टिकल विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुलींसाठी सुरक्षितता हा घटक महत्त्वाचा ठरतो. इयत्ता दहावीपर्यंत सर्व विषय अनिवार्य असतात. काही मुलींना आवड नसणाऱ्या विषयांचाही अभ्यास करावा लागतो. म्हणून करिअर निवडताना स्वतःच्या आवडली प्राधान्य द्यावे. मला कशात रस आहे, याचा विचार करावा. यासाठी मोठ्यांचे मार्गदर्शन गरजेचे आहे. म्हणून नियोजनपूर्वक माहिती मिळवावी. काही पुस्तके वाचावीत. आवडणारे, जमणारे व झेपणारेच विषय निवडावेत.
काही अभ्यासक्रम मुलांना उद्योजक बनण्याची संधी देतात. त्यासाठी जिद्द, परिश्रम व कष्ट घेण्याची तयार, सृजनशीलता आवश्यक आहे! मुली निसर्गतःच उत्तम व्यवस्थापक असतात. मुलींना अनेक लघुउद्योग खुणावत आहेत. बचतगटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. अनेक महिलांनी जिद्दीच्या जोरावर आपले व्यवसाय विकसित केले आहेत. आकाशाला गवसणी घालण्याएवढे कार्य करून ‘मी नोकरी करण्यासाठी शिकले नाही, तर नोकरी देण्यासाठी शिकले,’ हे वाक्य सार्थ केले आहे. अशा सक्षम महिला उद्योजक समाजाची गरज आहेत.
मुलींनो, चला सुरुवात करूयात. राष्ट्रउभारणीसाठी उद्योजक बनूयात...
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.