- प्रा. विजय नवले, करिअर मेंटॉरइंजिनिअरिंग हे करिअरचे ध्येय निश्चित केल्यानंतर पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे मार्ग कोणता निवडावा? म्हणजे अकरावी बारावी सायन्स मार्गे की डिप्लोमानंतर?.दोन्ही मार्गांचा अभ्यास करूयात..कालावधीदोन्ही मार्गांनी शिक्षणाचा कालावधी समान आहे. अकरावी-बारावी दोन वर्षांनंतर बीई, बीटेक पदवी चार वर्षांची आहे. म्हणजेच दहावीनंतर एकूण कालावधी सहा वर्षे. डिप्लोमा शिक्षण दहावीनंतर तीन वर्षांचे असते आणि डिप्लोमानंतर पदवीचा प्रवेश हा थेट दुसऱ्या वर्षात असतो. त्यामुळे दहावीनंतर डिप्लोमाची तीन आणि पदवीची तीन मिळून सहा वर्षे कालावधी असतो. म्हणजेच दोन्ही मार्गांनी समान कालावधी लागत असल्याने हा मुद्दा निर्णयासाठी महत्त्वाचा नाही..प्रवेशपरीक्षाबारावीमार्गे जाताना सीईटी किंवा जेईई परीक्षा पार कराव्या लागतात. डिप्लोमानंतर पदवीसाठी मात्र अशी कोणतीही प्रवेशपरीक्षा नाही. डिप्लोमानंतरचा थेट द्वितीय वर्ष प्रवेश हा डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील गुणांवर अवलंबून असतो. बहुपर्यायी परीक्षा सोप्या वाटतात त्याने बारावीचा मार्ग तर ज्याला लेखी दिर्घोत्तरे सहज वाटतात त्याने डिप्लोमाचा मार्ग निवडावा..कोणते मार्क्स महत्त्वाचे?बारावीमार्गे जाताना सीईटीमधील पर्सेन्टाइल महत्त्वाचे तर डिप्लोमामार्गे जाताना डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील टक्केवारी महत्त्वाची.पर्यायबारावी सायन्सनंतर इंजिनिअरिंगसोबत फार्मसी, आर्किटेक्चर, बीसीएस, बीसीएसह अनेक पर्याय खुले राहतात. अगदी बायोलॉजी असेल तर मेडिकलचा पर्यायसुद्धा. डिप्लोमानंतर मात्र इंजिनिअरिंग हा एकमेव महत्त्वाचा पर्याय असतो. त्यामुळे अन्य पर्याय नको असल्यास डिप्लोमाचा विचार करावा. ध्येय पक्के नसणाऱ्याने बारावी सायन्स स्वीकारावे..जागांची उपलब्धताबारावीमार्गे जाताना प्रथम वर्षात प्रवेश होत असल्याने सर्वच जागा उपलब्ध असल्याने मुबलक जागा असतात. डिप्लोमानंतर मात्र मर्यादित जागा उपलब्ध असतात. तरीही प्रत्यक्षात मात्र या जागादेखील तुलनेने पुरेशा असतात.शिक्षणातील प्रावीण्यबारावी सायन्समार्गे जाताना दोन वर्षे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हे सखोलपणे अभ्यासावे लागत असल्याने संशोधन क्षेत्रासाठी हे पोषक असते. डिप्लोमामार्गे जाताना दहावीनंतर लगेच तांत्रिकी शिक्षण असल्याने टेक्निकल विषयांसाठीचा एकूण कालावधी जरा अधिक आहे. हे उद्योजकतेसाठी पोषक असते..शिक्षणातील ब्रेककमीतकमी कालावधीत तांत्रिक ज्ञान घेऊन कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी हातभार लावायचा आहे; असे वाटणारा डिप्लोमावर शिक्षण थांबवू शकतो. आणि नोकरीसाठी इंडस्ट्रीमध्ये दाखल होतो. कारण इथे तांत्रिकी क्षेत्रातील पदविका हे प्रमाणपत्र मिळालेले असते. बारावीनंतर थांबण्याचा पर्याय मात्र परवडणारा नसतो. हे शिक्षण अपूर्ण असते..खर्चप्रत्यक्ष तांत्रिकी शिक्षणाचा खर्च बारावीमार्गे जाताना चार वर्षांचा तर डिप्लोमामार्गे जाताना सहा वर्षांचा आहे. परंतु बारावीमार्गे जाताना कोचिंग क्लासेसचा खर्च वाढत असतो. तेवढा कोचिंगसाठीचा खर्च डिप्लोमामार्गे नाही. शासन तांत्रिकी शैक्षणिक खर्चात विविध सवलती देत असते मात्र बारावीच्या कोचिंगसाठीची सवलत नसते.अर्थातच अमुक एक चांगले आणि दुसरे वाईट असे नसल्याने वरील सर्व मुद्द्यांचा एकत्रित विचार करून निर्णय घ्यावा. प्रत्येकाचा निर्णय वेगळा असू शकतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.