- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
आजकाल जिकडे पाहावं तिकडे विवेक हरवलेली माणसे सहजपणे हिंसेचा आधार घेताना दिसतात. असं वाटतं की बोलून, संवाद साधून आपलं म्हणणं पटवून देण्याचा मार्ग अशा व्यक्ती का स्वीकारू शकत नाहीत? यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे लहानपणापासूनच भाषिक विकास नीट झालेला नसणं.