‘सत्तासुरक्षा’ नव्हे, ‘जनसुरक्षा’च आपल्याला अभिप्रेत आहे, हे सरकारच्या कारभारातून प्रतीत व्हायला हवे; नुसत्या घोषणांमधून नव्हे.
प्रस्थापितांच्या विरोधात कालपरवापर्यंत संघर्ष करणारी मंडळी त्याच व्यवस्थेचा भाग बनतात, तेव्हा त्यांची भाषा आणि कल कसा बदलतो, हे ‘जनसुरक्षा’ विधेयकाच्या निमित्ताने समोर आले. नक्षलवादाला आळा घालण्याच्या कारणाने आणण्यात आलेल्या या विधेयकात पोलिस व सत्ताधाऱ्यांना निरंकुश अधिकार दिले होते.